Sunday, June 13, 2021

तुम्हाला सुद्धा एका सुंदर मुलीचा विडिओ काँल येऊ शकतो, पण सावधान!!

      एक दिवस आपण नेहमी प्रमाणे आपले Whatsapp उघडतो. आणि अचानक एका नवीन नंबर वरून मेसेज आलेला दिसतो. वाँट्सप नंबर च्या डिपी वर एका सुंदर मुलीचा फोटो असतो. आणि बोलता बोलता तोल सुटतो आणि जे नको घडायच ते घडून जाते.......!!
        मित्रांनो आज मानवाने किती प्रगती केली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहेतच पण या प्रगती सोबतच कुप्रगती म्हणजे पैसा मिळविण्या साठी व्यक्ति कुठल्या स्तरावर जाईल याचा अंदाज सुद्धा आपण लावु शकत नाही. आज आपण ज्या फसव्या जाळा बद्दल माहिती मिळविणार आहात त्याला "हनीट्रप" असेही म्हटल्या  जाते. म्हणजेच नावाप्रमाणेच या मध्ये लालूच दाखवून फसवणुकीचा प्रकार प्रामुख्याने घडतो. ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रेमाच्या किंवा अन्य तत्सम गोष्टी चे आमिष दाखवून कुठल्याही प्रकारची जबरदस्ती किंवा बळजबरी न करता आपल्या मनाप्रमाणे काम करुन घेतात. 
          हनीट्रप च्या माध्यमातून फसवणूक करने हि गोष्ट फार पूर्वी पासुन होत आलेली आहे. इतिहासात अनेक वेळा या हनीट्रप चा वापर करुन मोठमोठ्या कारस्थानांना पार पाडण्यात आले किंवा त्यांचा खात्मा सुद्धा करण्यात आला. ज्यावेळी शत्रू राष्ट्र शक्तिशाली सोबतच बुद्धीमान असायचे थोडक्यात जेथे हेर (जासुस) सुद्धा शरणागती पत्करायचे तेथे या हनीट्रप चा योग्य वापर करुन डाव साधल्या जात असायचा. ज्या मध्ये कुठल्याही दलाच्या मुख्य अधिकार्यांला लक्ष करुन फसविल्या जात असे. ज्यामध्ये बर्याच वेळा एक सुंदर मुलगी अगोदरच ठरविण्यात आलेल्या अधिकार्यांच्या संपर्कात यायची आणि प्रेमात पडायची. त्या नंतर जवळीकता वाढविल्या नंतर अत्यंत गोपनीय योजनेबाबत संपूर्ण माहिती शत्रूराष्ट्रांना होत असे. अशे एक ना अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. 
       हि झाली थोडक्यात आंतराष्ट्रीय स्तरावरील माहीती आता वळूयात सामान्य माणसांकडे. यावेळी तुम्हाला आपसुकच प्रश्न पडला असेल की!! ना आपण कुठले मोठे अधिकारी? ना आपल्या जवळ कु़ठली गोपनिय माहीती? तर आपल्याला कश्याला घाबरायची गरज?. तर मित्रांनो आपल्याला घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची गरज आहे. आणि आपण हनीट्रप मध्ये कसे अडकु शकतो ते खालील उदाहरणावरून कळेलच. 
        एके दिवशी श्याम (नाव बदललेले) ला वाँट्सअप वर एका अनोळखी मुलीचा मेसेज येतो. आणि समोरुन "साँरी चुकुन मेसेज आला" असा पहिला मेसेज दिसतो आणि अश्या पद्धतीचे संभाषण सुरू होते. अगोदर शाम ने दुर्लक्ष केल, कारण त्याला वाटले की आपल्याच मित्रांमधुन कुणीतरी मस्करी करत असेल. पण रात्री ११ च्या सुमारास परत मेसेज येतो की "काय करत आहात?" त्यावेळी मात्र श्याम चा तोल सुटतो आणि तो विश्वास ठेवून बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर याच प्रमाणे एक आठवडा  चँटिग सुरु राहते. आता मात्र श्याम ला कुठेतरी न पाहिलेल्या न भेटलेल्या प्रेमाचा सुगंध त्या संभाषणातुन दरवडायला लागतो. आणि घरची माहीती, फॅमिली बॅकग्राउंड, पैसे, मित्र- मैत्रीण एकंदरीत सर्व माहीती तो मोठमोठ्या डिंगा हाकत तो देत असतो. 
       त्यानंतर असच बोलन सुरु असतांनाच समोरुन मुलगी सरळ विडीओ काँल वर बोलायची ईच्छा दर्शवते. श्याम ला जणुकाही एक कठिण परिक्षा पास झाल्याचा आनंद मिळतो आणि तो पण क्षणात तयार होतो. मात्र विडिओ काँल मधे तुमचा चेहरा दिसायला हवा हि अट ठेवण्यात येते. श्याम छानपैकी तयारी करुन काँल ची आतुरतेने वाट बघत असतो. शेवटी काँल येतो!! ह्रदयाची गती एकदम वाढते, काँल उचलल्या जातो. आणि जसा तो काँल सुरु होतो  त्याच्या समोर एक मुलगी विवस्त्र अवस्थेत त्याच्या समोर उभी असते. 
         त्याला काही कळायच्या आत तो काँल कट होतो. आणि थोड्याच वेळात त्याला एक एडिट केलेला विडिओ त्याच नंबर वरुन मिळतो. ते बघुन त्याच्या पायाखालची जमिन जणू घसरते कारण त्या विडिओ मध्ये तो अत्यंत वाईट स्थितीत दिसतो. त्यात फक्त जेव्हा त्यांने काँल उचलला तेव्हाचा विडिओ आणि त्याच कपड्यांमध्ये दुसऱ्या मुलाचा विडिओ एक सोबत जोडुन जणू त्याचे पोर्न विडिओत रुपांतर केले असा विडिओ दिसतो. 
      आणि पुढचा मेसेज आला ज्यामध्ये त्याला २ लाख रुपयाची मागणी करण्यात आली. किंवा तसे न केल्यास त्याचा तो विडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन त्याच्या आई वडीलांना पण पाठवेल हि धमकी देण्यात येते. आणि क्षणात संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाल्याचा अनुभव श्याम ला येतो. 
        मित्रांनो आज श्याम प्रमाणेच अनेक युवक या फसव्या जाळ्यात अडकून संकटात सापडले आहेत. किंवा अजुनही सापडत आहेतच. आता आपल्या पैकी बर्याच लोकांना प्रश्न पडला असेल कि एवढ्या गंभीर विषयावर अजूनही कुठल्या प्रकारची दखल का घेण्यात आली नाही. तर त्याला उत्तर हेच की त्याला त्या प्रकरणाला तिथेच संपवायचे असते. म्हणून हा प्रश्न कधी चव्हाट्यावर आलाच नाही. 
         आता यापासून स्वतचे रक्षण कसे करायचे? तर शक्यतोवर जेव्हा कुणाचा असा मेसेज आपल्याला आला त्यावेळी तो कुणाचा आहे हे ट्रुकाँलर किंवा आपल्या जवळच्या मित्रांकडुन तपासून घ्या बोलतांना घाई करु नका. जर फेसबुक वरुन अश्या प्रकारचा मेसेज येत असेल तर त्यामध्ये आपले म्युच्युअल फ्रेन्ड्स किती आहेत. सोबतच किती दिवसा अगोदर च्या पोस्ट आहेत. हे तपासुन घ्या. आणि शक्यतोवर अनोळखी लोकांशी बोलतांना सयंम ठेवा. मित्रांनो हे आपल्या सोबत नाही होणार किंवा मला काही फरक पडत नाही. मानसिकते मध्ये न राहात सतर्क राहा कारण "अपघात हा लाखो प्रसंगामधुन एकदाच होतो, पण जेव्हा होतो तेव्हा आयुष्य उध्वस्त करुन जातो", काळजी घ्या.

अँड. सुरज गजाननराव जामठे
संस्थापक अध्यक्ष, 
लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन महाराष्ट्र
मो. ९७६६२५७०६७

तोडांत खर्रा (गुटखा) आणि हातात भगवे-निळे झेंडे आणि जयघोष!!

       १९ फेब्रुवारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचेच आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या दिवसाची महती सांगावी तेवढी कमी. हाच तोच सुवर्ण दिन आहे ज्या दिवशी महाराष्ट्राचे कैवारी शिवनेरीच्या पावन धर्तीवर जन्माला आले. आणि त्यांनी आपल्या जिवाभावाच्या माणसांना सोबत घेऊन रक्ताचे पाणी करुन या स्वराज्याची स्थापना केली. यासाठी कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देत त्याची प्राणज्योत विझवून या महाराष्ट्राची धगधगती मशाल पेटविली. आणि येथील भूमी सुजलाम सुफलाम केली.
     आपल्या राजाची जयंती न जाणे कित्येक शिवप्रेमी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करतात. आणि हे चित्र पाहून खूप जास्त हायस होत आणि तेवढीच ऊर्जा मिळते. याच प्रकारे आज आम्ही ही शिवजयंती साजरी करण्याच्या उद्देशाने काही तरी आगळावेगळा कार्यक्रम घेण्याचा मानस घेऊन बाहेर पडलो. रस्तावरील असंख्य बाईक रँली पाहून पूर्ण रस्ते दणाणून निघत होते आणि या कडे आम्ही सर्व मोठ्या गर्वाने बघत होतो. आणि तेवढ्यात एका युवकावर नजर पडली. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व त्यात महाराजांसारखी दाढी आणि डोक्यावर चंद्राची कोर साजेशी दिसत होती आणि हातात भगवा झेंडा घेऊन त्याच्यातच खरा शिवभक्त दिसत होता. पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की त्यांच्याकडे जी उत्साहवर्धक नजर होती ती अचानक रागात परिवर्तित झाली. तो युवक आपल्या गाडीवरुन ज्या उत्साहाने महाराजांच्या नावाचा जयघोष करीत होता त्याच गाडीवरुन खर्याच्या पिचकाऱ्या त्या रस्त्यावर मारत होता.
          अचानक असंख्य प्रश्नाचा गोंधळ डोक्यात उडाला. म्हणजे ज्या महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्या जिवाचे रान करुन हे स्वराज्य निर्माण केले ते याच नालायक युवकांसाठी केले असेल का? महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक मंडळ मोठमोठ्या शोभायात्रा आयोजित करतात पण यामध्ये काही युवक दारु पिऊन तसेच गुटखा खाऊन सहभाग घेतात आणि नंतर रस्ताने मोठ्या प्रमाणावर गाडीने ध्वनि प्रदूषण करुन आपला आसुरी आनंद प्रदर्शित करतात. आणि काही युवक बेधुंद होऊन डि.जे च्या कर्णकर्कश आवाजात दारु पिऊन धिंगाणा घालतात.
              खरंच आज अश्या युवकांना महाराजांचे विचार समजायची नितांत गरज भासत आहे. स्त्रीचा आदर, स्वच्छता, समानतेची वागणूक, मोठ्यांचा आदर या सर्व गोष्टी महाराज आपल्याला शिकवून गेले आहे. आणि आज तीच शिकवण शिकायची वेळ आली आहे.
           कुठल्याही व्यक्तीला जाणून घेण्यासाठी अगोदर आपल्याला त्याच्या चरित्र्याला जाणून घेणं गरजेचे असते. कारण व्यक्ति हा मरण पावतो पण तो सर्वांच्या आठवणीत राहतो त्याच्या कर्मामुळे आणि चारित्र्यामुळे.  श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला त्यांच्या चारित्र्यापासून असंख्य अश्या गोष्टी शिकवून गेले. कैदेतील शत्रूच्या पत्नीचाही मानसन्मान करुन तिच्या अब्रुला धक्काही न लागु देता तिला साडी चोळीचा आहेर करुन तिला परत पाठविले होते. एवढा प्रचंड स्त्री जातीचा सन्मान होता पण आजची परिस्थिती पाहता खरंच मन तुटून येत आहे. ५ वर्षाच्या मुलीपासून ते ८० वर्षांच्या वृद्ध स्त्रीलासुद्धा आपल्या संरक्षणासाठी धडपडावं लागत आहे. 
            महाराजांनी आपल्या रयतेसोबत कधीच भेदभाव होऊ दिला नाही. पण आज ती परिस्थिती नाही राहिली काही मोजक्या राजकारणी लोकांनी आपल्या राजनैतिक फायद्यासाठी कधी या भुमीत जाती आणि धर्माच बिज पेरल हे कळलंच नाही आणि समाजाचा पार बट्याबोळ करुन टाकला. प्रत्येकाला एका विशिष्ट जाती आणि धर्माच्या नावाखाली बांधून ठेवण्यात आले आहे. आणि याच भानगडीत आजच्या युवकांना माणुसकीचा कुठेतरी पार विसर पडत आहे.
         आज खरंच युवकांनी शिवचरित्र वाचायची गरज आहे. जर याचप्रमाणे स्त्रियांचा अनादर होत राहिला याचप्रमाणे युवक आपल्या जबाबदाऱ्या सोडून चूकीच्या मार्गाने जात राहिला तर "राजे पुन्हा जन्माला या" हे वाक्य म्हणायची हिम्मतही होणार नाही.

त्या खर्रा (गुटखा) ची पिचकारी मारणाऱ्या युवकास समर्पित...

सुरज गजानन जामठे
संस्थापक अध्यक्ष ९७६६२५७०६७
लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन अमरावती.

Monday, June 29, 2020

विद्यार्थी देशाचे भविष्य आहे की राजकीय भांडवल??


विद्यार्थी देशाचे भविष्य आहे की राजकीय भांडवल?? 

सध्या राज्यात कोरोना महामारी ने काय थैमाम मांडुन ठेवलाय हे वेगळे सांगायची गरज नाही. संपूर्ण जीवनमान विस्कळीत झाले आहे. कुणाला जेवायला अन्न मिळत नाहीए तर कुणाला हाताला काम मिळत नाहीए सर्व आपल्या आपल्या अडचणींमुळे मानसिक दडपणाखाली जगत आहे. 



            या सर्वांमध्ये आणखी एक मोठा समुह आहे तो कुठेतरी दुर्लक्षीत होत आहे ना त्याच्यासाठी प्रसारमाध्यमे धाव घेत आहेत ना कुठलाही पुढारी उघडपणे बोलत आहे. थोडक्यात एक दोन विद्यार्थी संघटना वगळता बाकी सर्व बघ्याची भुमिका घेत आहे. एवढच काय तर पालक वर्ग पण फक्त सरकार च्या निर्णयाची वाट बघत आहे. आणि जो मोठा समुह यात भरडला जात आहे त्याच नाव आहे "अंतिम वर्षाचे विद्यार्थी" 
         आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. सावंत सर अनेक दिवसांपासून विद्यार्थाच्या फेसबुक लाईव च्या माध्यमातून संपर्कात आहेत जरुर पण थोडक्यात त्याच्या कडून प्रत्येक वेळच्या भेटी नंतर एकच आश्वासन दिसते ते म्हणजे "विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्या जाईल". थोडक्यात त्याला आधार पण मिळाला तो म्हणजे मा. मुख्यमंत्री यांच्या त्या घोषणे नंतर ज्यात स्पष्टपणे सांगितले होते की अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द करण्यात येत आहे व एटिकेटी च्या विद्यार्थासाठी येत्या २ दिवसात योग्य तो निर्णय घेऊन आराखडा विद्यार्थ्यांन समोर मांडण्यात येईल. संपूर्ण विद्यार्थ्यांची एकदाची संम्रभाच्या अवस्थेतून सुटका झाली अस वाटल. पण कदाचित हा आनंद काही तासा पर्यंतचाच होता. 
       त्या नंतर लगेच आशिषजी शेलार हे मा. राज्यपाल यांची भेट घेतात आणि नंतर मा. राज्यपाल साहेबांचे ट्विट येते की हा निर्णय विद्यापीठ कायद्याचा भंग आहे तसेच कुलपति या नात्याने त्यात त्यांचे मत हे सर्वात महत्त्वाचे होते तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यात त्याच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हा निर्णय विद्यार्थांन पुढ ठेवला. व त्यांनी कडक शब्दांत सांगीतले की अंतिम वर्षाच्या परिक्षा कुठल्याही परिस्थितीत होणारच!! आणि दबक्या आवाजात या निर्णयामुळे राजकिय वर्तुळात नक्कीच मोठा फरक पडले हा विचार कदाचित सत्ताधारी व विरोधीपक्ष करत आहे हि चर्चा रंगली आहे. आणि कदाचित याच कारणामुळे या निर्णयाला एवढा विलंब होत आहे.
         हि झाली आता पर्यंतची परिस्थिती पण या मध्ये विद्यार्थाच्या मवावर काय परिणाम होतोय याची कल्पना कुणी करत आहे का? विद्यार्थाला किती मानसिक दडपणाखाली राहाव लागत आहे याचा विचार कुणी करत आहे का? शेवटच वर्ष म्हणजे फक्त शेवटच वर्ष नसुन ते प्रत्येक विद्यार्थाच्या नवीन आयुष्याची पहिली पायरी समजल्या जाते. कितीतरी विद्यार्थावर त्यांच्या घरच्यांनच्या जबाबदार्याच ओझ राहते झटपट कुठेतरी काम मिळवुन कुठुंबाला आधार मिळावा हा मानस राहतो तर कुणाला उच्चशिक्षणासाठी कुठेतरी शिक्षणाला जायचे असते. थोडक्यात आपण कधीतरी एकांतात जी छान छान स्वप्न रंगवितो त्यातीललच एक भाग हा. पण सध्या राज्यातील शैक्षणिक परिस्थिती पाहता "कुणाचच पण खेटर कुणाच्याच पायात नाही " हि म्हण सार्थकी ठरेल. 
         दुसरा मुद्दा असा की काही बुद्धीजीवी लोकांच अस म्हणन आहे की परीक्षा न होने हा विद्यार्थ्यांच्या भविष्या सोबत अन्याय होईल.परिक्षा या झाल्याच पाहिजे तर त्यांना सांगु इच्छीतो की कुठलाही विद्यार्थी हा शेवटच्या वर्षापर्यंत पोहोचला म्हणजे नक्कीच त्यांने आतापर्यंत सर्व परिक्षा दिल्याच असतील आणि याचाच अर्थ असा की तो या समोरची परिक्षा देण्यास सुद्धा सक्षम आहे. थोडक्यात विद्यार्थी हा परिक्षेला घाबरत नाही. तो घाबरत आहे फक्त आणि फक्त आपल्या जिवाला कारण त्याच्यावर त्याचे आईवडील त्याचे कुटुंब अवलंबून आहे. 
        शेवटी शासनाला एवढच सुचवायचे आहे की परिक्षा घेणे न घेने हा त्यांचा निर्णय आहे विद्यार्थांना लवकरात लवकर या संभ्रम अवस्थेतून सुटका करावी. परिक्षा घ्यायच्या असल्यास विद्यापीठ कायद्यानुसार परिक्षेच्या ६० दिवसा अगोदर विद्यार्थांना सुचना करण्यात यावी. सर्व विद्यार्थांचा विमा काढण्यात यावा. व परिक्षा केंद्रावर कडक पहारा देत कुठलाही विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात न यावा याची दक्षता घ्यावी. किंवा जर परिक्षा रद्द करण्यात येत असेल तर त्या बद्दल सांगावे. 
             निर्णय कुठलाही असो तो लवकर घेण्यात यावा कारण या विद्यार्थी हे देशाच भविष्य आहे राजकारण करायच भांडवल नाही.

सुरज ग. जामठे
संस्थापक अध्यक्ष
लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन (महाराष्ट्र)


Sunday, June 28, 2020

कोरोना, मानुस मारला, पण निसर्ग तारला!!


कोरोना, माणुस मारला, पण निसर्ग तारला!!

जगात प्रत्येक गोष्ट ला दोन बाजू असतात आज कोरोना वायरस सारख्या वैश्विक महामारी मुळे जग नक्कीच संकटात सापडले आहे पण त्यालाच दुसरी बाजु हि की लोकांना त्याच्या खर्या गरजांची जाणिव झाली आहे. लोकांचा वावर कमी झाल्यामुळे निसर्ग स्वच्छंदी पणे श्वास घेतोय. मनाला हेलावून टाकणार्या गंभीर घटना म्हणजेच खून, बलात्कार, चोरी अश्या घटनांचा आकडा शुन्यावर आला आहे. नद्या खळखळून वाहत आहे. आणि विशेष म्हणजे जो माणूस फक्त व्यवहारिक झाला होता तो आता खर्या अर्थाने पारिवारिक झाला आहे.
आज कोरोना या वैश्विक महामारी ने संपुर्ण विश्वाला आपल्या वेठिस धरले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि उद्योग धंदे बंद पडले आहे आणि नक्कीच जग हे जागतिक मंदीच्या दारात उभ आहे. आज लाखो लोक या भयंकर महामारिच्या विळख्यात अडकून जीवन आणि मरणाची लढाई लढत आहे. मुळचा चिन या देशातुन सर्वीकडे पसरलेल्या या कोरोना वायरस मुळे आज जगातील सर्वच देश याच्या दहशतीच्या वातावरणात जगत आहे. आणि विशेष म्हणजे या विषारी वायरस मुळेे उघड्यावर राहणाऱ्या अत्यंत गरीब व्यक्ति पासुन ते जागतिक दर्जाची सुरक्षतेच्या घेर्यात राहणार्या आतंरराष्ट्रीय नेत्यांना सुद्धा या वायरस ची लागण झाली आहे. काही देश वगळता सर्व देशामध्ये तेथील सरकार ने कडक कायदे करुन लाँकडाऊन केला आहे. आणि न भुतो!! न भविष्यती!! आज जगातील ७० टक्के जनता हि आपल्याच घरात कैद झाली आहे. आणि सद्यस्थितीत हिच एक गोष्ट आहे जी आपल्याला या वायरस च्या संसर्गापासून वाचवु शकते. आता हि गंभीर परिस्थिती झाली मनुष्यासाठी पण या सर्वांन मुळे कमालीचा फायदा झालाय तो पर्यावरणाला. आज सर्वच जगात औद्योगिक क्रांति मुळे झपाट्याने वाढलेले उद्योग धंदे त्यामुळे माणसाचे जीवनमान उंचावले. सर्व सुखसोयींनी माणुस हा ओतप्रोत झाला. पण याच नशेत तो पर्यावरणाचा किती भयंकर प्रमाणात ह्रास करत होता या कडे थोड हि लक्ष देत नव्हता. जागतिक पर्यावरण टिकण्यासाठी अनेक समित्या गठण करण्यात आल्या. अनेक कडक कायदे सुद्धा बनविण्यात आले पण फक्त आणि फक्त पैश्याच्या मोहा पाई अंधाधुंध प्रदुषण पसरविण्यात आले. आज फॅक्टरी किंवा वाहनातून निघणार्या धुरा मुळे हवेची गुणवत्ता एवढी खराब झाली आहे कि अत्यंत छोट्या मुलापासून ते वयोवृद्धापर्यत प्रत्येकाला श्वसनाचे आणि फुफ्फुसांचे आजार झपाट्याने वाढत आहे. त्याच बरोबर या विषारी गँसेस मुळे आपल्या पृथ्वी चे सुरक्षा कवच म्हणजेच ओझोन पट्टयाला भयंकर हानी होत आहे आणि म्हणूनच पृथ्वी चे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या मधुन अस्वच्छ आणि केमिकल युक्त प्रदुषित पाण्याला छोट्यामोठ्या नद्यांच्या प्रवाहामार्फत वाहून नेऊन कितीतरी नद्यां या फक्त नावापुरत्या मर्यादित राहिल्या आहे. आज या कोरोना मुळे जो लाँकडाऊन झाला आहे तो पर्यावरणासाठी नक्किच हितकारक झाला आहे. संपूर्ण उद्योग धंदे बंद असल्यामुळे हवेच्या गुणवत्ते वाढ झाली आहे. वाहतूक पुर्ण पणे बंद असल्यामुळे कार्बनडाइऑक्साइड कमी झाल्यामुळे जे लोक दमा आणि श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होते त्यांना आराम मिळतोय. करोडो रुपये खर्च करुन सुद्धा जि गंगा नदी साफ होऊ शकली नाही त्याच नदीच्या पाण्याची गुणवत्ता हि ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. यमुनेच्या पाण्यात सुद्धा तेच सकारात्मक बदल दिसून येत आहे. आज रस्तावर ते प्राणी आढळून येत आहे त्यांची आपण फक्त नावे एैकली होती. चिन सारख्या देशात महिन्याकाठी हजारो लोक हे फक्त दुषित वातावरणामुळे मरायचे त्याचा आकडा नाहीसा झाला आहे. एक बाजु जरी खुप विदारक असली तरी दूसरी बाजु नक्किच पर्यावरणासाठी लाभकारी ठरली आहे. आपले डाॅक्टर वैज्ञानिक लवकरच यासाठी उपचार शोधतीलच यात शंका नाही. तो पर्यंत आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण शासनाला सहकार्य करावे व घरातच स्वतःला सुरक्षित ठेवावे. सोबतच आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आपला निसर्ग आपल्याला टिकवुन ठेवायचा आहे कारण या निसर्गामुळेच आपले अस्तित्व आहे. कारण आज फक्त एका वायरस मुळे आपल्याला या परिस्थितीत लोटल आहे जर भविष्यात या निसर्गानेच आपल्या विरोधात धावा बोलला तर पुर्ण पृथ्वी वरील सजीव सृष्टी धोक्यात येईल....... सुरज ग. जामठे संस्थापक अध्यक्ष लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन अमरावती.

तुम्हाला सुद्धा एका सुंदर मुलीचा विडिओ काँल येऊ शकतो, पण सावधान!!

      एक दिवस आपण नेहमी प्रमाणे आपले Whatsapp उघडतो. आणि अचानक एका नवीन नंबर वरून मेसेज आलेला दिसतो. वाँट्सप नंबर च्या डिपी वर एका सुंदर मुल...